top of page
website.jpg

BREAKING: सासरच्या छळाला कंटाळून विवाहितेची चिमुकल्यासह विहिरीत उडी! ५ जणांवर आत्महत्यास प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल




खर्डा (विशेष प्रतिनिधी): 12 मे2026


जामखेड तालुक्यातील वंजारवाडी येथे सासरच्या मानसिक व शारीरिक छळाला त्रासलेल्या एका २४ वर्षीय विवाहितेने आपल्या दीड वर्षीय चिमुकल्या मुलासह विहिरीत उडी घेत आत्महत्या केली. या धक्कादायक घटनेमुळे संपूर्ण परिसरात हादरवून टाकणारी खळबळ उडाली असून, खर्डा पोलीस ठाण्यात पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. मयताच्या कुटुंबीयांनी गुन्हा दाखल न झाल्यास अंत्यसंस्कार न करण्याचा इशारा दिला होता, ज्यामुळे तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले होते.


रविवारी सकाळी अकरा वाजण्यापूर्वी खर्डा हद्दीतील  वंजारवाडी येथील दत्तात्रय सोपान ढाळे यांच्या विहिरीत साळु शिवाजी चौरे (वय २४) व तिचा मुलगा शिवांश शिवाजी चौरे (वय १.५ वर्षे) यांनी उडी घेतली. या प्रकरणाची फिर्याद साळु यांच्या वडिलांनी देविदास  शंकर तांदळे (रा. बांगर वस्ती, वंजारवाडी) यांनी खर्डा पोलीस ठाण्यात दाखल केली.


फिर्यादीनुसार, विवाहानंतर काही महिन्यांपासून साळु यांना सासरच्या मंडळींकडून सतत छळ सहन करावा लागत होता. शेतीच्या कामात व घरकामात हातखंडा नसल्याचे कारण देत त्यांच्याकडून मानसिक दबाव, मारहाण व अपशब्दांचा समावेश असलेला त्रास दिला जात होता. या सततच्या छळाला कंटाळून साळु हिने मुलाला घेऊन टोकाचे पाऊल उचलल्याचे फिर्यादीत स्पष्ट करण्यात आले आहे.


या प्रकरणी पती शिवाजी अंगद चौरे, सासरे अंगद दशरथ चौरे, सासू विजुबाई अंगद चौरे, दीर धनंजय अंगद चौरे आणि जाऊ कमल धनंजय चौरे यांच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता (बीएनएस) कलम १०८ (आत्महत्येला प्रवृत्त करणे) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी रात्री उशिरा हा गुन्हा नोंदवला, ज्यामुळे मयताच्या नातेवाईकांनी प्रेत ताब्यात घेतले.


घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी प्रवीणचंद लोंखडे यांनी घटनास्थळी धाव घेतली. मयतेचे शवविच्छेदन ग्रामीण रुग्णालय जामखेड येथे झाले.

खर्डा पोलीस स्टेशन पुढील तपास करीत असून, इतर कोणत्याही व्यक्तींचा सहभाग असल्यास त्या दृष्टीने सर्व बाजूंची खबरदारी घेतली जात आहे.


पोलीस बंदोबस्तात मयतेचे अंत्यसंस्कार पार पडले – आईला अग्निदाह देऊन व चिमुकल्या शिवांशला दफन करण्यात आले.


खर्डा पोलीस स्टेशनसमोर मयताच्या नातेवाईकांसह ग्रामस्थांचा मोठा जमाव जमला होता. "गुन्हा दाखल होईपर्यंत अंत्यविधी करणार नाही," असे मयताच्या कुटुंबीयांनी 'पोलीस वारंट न्यूज'ला सांगितले.

या घटनेमुळे वंजारवाडी व आजूबाजूच्या गावांमध्ये स्त्रियांवरील कौटुंबिक हिंसाचाराच्या मुद्द्यावर संताप व्यक्त केला जात आहे. स्थानिक नेते व सामाजिक कार्यकर्त्यांनी या प्रकरणाची न्यायालयीन चौकशीची मागणी केली आहे.


या घटनेने जामखेड तालुक्यातील कौटुंबिक हिंसाचाराच्या समस्येवर पुन्हा प्रकाश टाकला असून, पोलिसांना न्याय मिळवून देण्याची जबाबदारी आहे.

 
 
 

Comments


POLICE WARRANT

Policewarrant@gmail.com
Tel: 9970529697 | 7558789697 | 8888785253

Kharda, Maharashtra india 413204

  • X
  • Facebook
  • LinkedIn

© 2026 by POLICEWARRANT Built on DIGITALFLY

bottom of page